<?xml version="1.0" encoding="utf-8"?><rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
	<channel>
		<atom:link href="https://www.radhanagari.com/blog/x5feed.php" rel="self" type="application/rss+xml" />
		<title><![CDATA[Treasure & pleasure of Radhanagari]]></title>
		<link>https://www.radhanagari.com/blog/</link>
		<description><![CDATA[Its about Radhanagari... the dreamland of Chhatrapati Shahu Maharaj. ]]></description>
		<language>EN</language>
		<lastBuildDate>Wed, 02 Mar 2022 15:02:00 +0000</lastBuildDate>
		<generator>Incomedia WebSite X5 Pro</generator>
		<item>
			<title><![CDATA[यावेळची दाजीपूर अभयारण्य भटकंती अविस्मरणीयच...]]></title>
			<author><![CDATA[सौरभ मुजुमदार]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=Dajipur"><![CDATA[Dajipur]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_00000000A"><div><div class="imTAJustify"><img class="image-0 fleft" src="https://www.radhanagari.com/images/dp.webp"  title="" alt="" width="211" height="211" /></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">महाराष्ट्रातील सर्वात जुने &nbsp;अभयारण्य &nbsp;दाजीपुर गवा अभयारण्य. राजर्षी &nbsp;छत्रपती शाहू महाराजांनी हा भाग शिकारीसाठी राखीव ठेवलेला होता. त्यामुळेच या अभयारण्याचा पाया रचला गेला. प्रत्येक भटकंतीचे अनुभव शेअर केल्याने त्याचा उपयोग नंतर जाणाऱ्या पर्यटकांना नक्कीच होतो म्हणून हा प्रयत्न.<br></span></div></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">परिस्थितीकी विकास समिती ओलवण व वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला "ठक्याचा वाडा तंबू निवास" हा प्रकल्प म्हणजे प्रत्यक्ष जंगलात राहण्याचा अनुभव परंतु पूर्णतः सुरक्षित. याच परिसरात मागील आठवड्यात मुरडा बांबर पाणवठ्यावर पर्यटकांना पूर्ण वाढ झालेला नर जातीचा बिबट्या वाघ दिसला होता. तिथून हाकेच्या अंतरावरच म्हणजे एक किलोमीटरवर हा तंबू निवास आहे. यापूर्वी महाविद्यालय मित्रांसमवेत भटकंती असायची परंतु आमच्या पुढील छोट्या पिढीलाही हा छंद लागल्याने ही भटकंती आता सहकुटुंब.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">तंबू निवासस्थानापासून प्रवेशद्वारातून सहज बाहेर पडल्यावर केवळ पन्नास फुटांवर रात्री नऊ वाजता चार ते पाच गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. उन्हाळ्यात दाट जंगलातील पाणीसाठा कमी झाल्याने हे वन्यप्राणी बाहेर पडतात. परंतु त्यांना पाणी पिण्याचे मार्गावर जाताना काही अडथळा होऊ न देण्याचे आपले कर्तव्य विसरू नये.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">अधिकृत वन्यजीव विभागाचे वाहन घेऊन आम्ही &nbsp;उघड्या जीपमधून जंगल सफारीला बाहेर पडलो .वन्यप्राणी दिसणे हा एक नशिबाचाच भाग असतो. सांबरकोंड ते सावराई सडा मार्गावर आम्हाला शेकरू व त्याचे घरटे, हळद्या पक्षी खारुताई, गरुड, तुरेवाला पक्षी, रान कोंबडा, स्वर्गीय नर्तक, रंग बदलणारा पारवा &nbsp;या पक्षांसह रानटी जायफळ, नरक्या अशा विविध वनस्पती <span class="imTALeft">पाहायला मिळाल्या. </span></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">सावराई सड्यावर सांबराची शिकार केलेल्या बिबट्या वाघाची ताजी विष्ठा व इतर हालचाली अनुभवास मिळाल्या. वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन यासोबत त्यांच्या पायाचे ठसे, विष्ठा, झाडावरील ओरखडे याचा अनुभव, अभ्यास, निरीक्षण तेवढेच महत्त्वपूर्ण आहे.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">सांबरकोंड वरून परत वाघाचे पाण्याकडे जाताना मधल्या पठारावर अचानक दर्शन झाले तो म्हणजे राधानगरी चा वैभव असणारा "गवा" आमच्याकडे कटाक्ष नजर टाकून यांच्यापासून निश्चितच काही धोका नाही हे ओळखून त्याने आपले चरणे चालू ठेवले. वाटेत तीन ते चार ठिकाणी गव्यांचे कळप पाहून आमची सफारी संपली.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">जोपर्यंत तुम्हाला जंगलात भटकताना प्रत्यक्ष वन्य प्राण्याचे मुक्त संचार करताना दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला जंगलाचे भय वाटत नाही व भटकंतीचा छंद ही लागत नाही. चिंता, उत्साह, आनंद, गोंधळ अशा एकत्रित विचारांचा अनुभव आपल्याला &nbsp;वन्यप्राणी दर्शनानेच मिळतो. येथूनच सुरु होते जंगल फिरण्याचे वेड. दुसर्‍या दिवशी पहाटे तंबू निवासातून बाहेर पडल्यावर केवळ शंभर ते दोनशे मीटर अंतरावर सरपटणार्‍या जीवांच्या मातीतील रात्रभर च्या हालचाली, अस्वलाच्या पायाचे ठसे, यासह &nbsp;बिबट्याची व &nbsp;अस्वलाची ताजी विष्ठा, मुंगुसा च्या पायाचे ठसे दिसले. रात्रभर हया वन्यप्राण्यांच्या हालचाली आमच्या सभोवती कशा चालू होत्या एक क्षणभर नजरेसमोर उभे राहिले.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">या निवासस्थानावर विजेची सोय नाही आपणास सौरऊर्जेवरील प्रकाशा वरच रात्र काढावी लागते &nbsp;परंतु येथील निवास व्यवस्थापक वन्यजीव कर्मचारी सिद्धेश पाटील व समितीचे कर्मचारी आपणास जिद्द, धाडस, व निसर्ग प्रेमाचा &nbsp;अनुभव याची वेगळीच उर्जा देऊन जातात. गावाकडील पाहुणचार, निसर्गाशी एकरुपता, यांचा अनुभव घेत आपण नकळत त्या जंगलाचा एक भागच होतो. परंतु निसर्गाच्या चक्राप्रमाणे जीवनचक्राचा आपला कार्यभार साधनेसाठी जड पावलाने या परिवाराचा निरोप घेऊन माणसांच्या दाट जंगलात जाण्यासाठी परतीचा प्रवास चालू होतो. तुम्हाला जंगल सफारीचा अनुभव हवा असल्यास मी व माझे निसर्गप्रेमी मित्र तसेच वन्यजीव कर्मचारी सदैव मदतीला असणारच.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">असाच जंगलाचा आणखीन एक पुढील माहितीचा खजिना लवकरच.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">-</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">सौरभ मुजुमदार,</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">तरूण भारत,</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">कोल्हापूर</span></div></div></div>]]></description>
			<pubDate>Wed, 02 Mar 2022 15:02:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/dajipur_1_thumb.webp" length="564988" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?dajipur_safari</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/00000000A</guid>
		</item>
		<item>
			<title><![CDATA[आपल्याला जंगलाचं शिष्यत्व पत्करावं लागेल.]]></title>
			<author><![CDATA[मेघश्री श्रेष्ठी]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=The_Western_Ghat"><![CDATA[The Western Ghat]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_000000009"><div class="imTAJustify">लॉकडाऊन नंतर घरातून बाहेर पडावं, थोडं फिरून यावं असं प्रकर्षानं वाटू लागलं. फक्त कीबोर्ड बडवण्याच्या नादात आपण घर कोंबडे कधी झालो हेच कळलं नाही. अशातच एका मित्राने मंदार वैद्य यांची ओळख करून दिली. त्यांच्या स्टेटसवरील निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो पाहून तर फिरण्याची इच्छा आणखी आणखी तीव्र होऊ लागली. त्यांना एकदा दोनदा हटकलं देखील. कुठे आहेत ही ठिकाणं? आम्हालाही बघायचं आहे, वगैरे. आम्ही लवकरच ट्रीप प्लन करू तेव्हा कळवू असं ते म्हणाले. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">अशातच दोन चार महिने गेले असतील आणि एक दिवस त्यांचा व्हाट्सअपवर मेसेज आला. राधानगरी-दाजीपूर जंगल सफारीचा. ही सहल म्हणजे माझ्यासाठी अगदी पर्वणीच होती. मग काय मी आणि दोन मुलं असं तिघांचीही जागा कन्फर्म केली आणि शेवटी ९ जानेवारी २०२२चा तो दिवस उजाडला. यावर्षात मनसोक्त फिरून घ्यायचं असा संकल्प केलेल्या माझी या वर्षातील ही पहिलीच सहल! पण हा अनुभव नितांत सुंदर होता. इतका की आठवणीच्या गाठोड्यातून काही सुंदर क्षण काढायचे असं ठरवलं तर पाहिलं आठवण होईल ती म्हणजे या टीम सोबत केलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसराच्या या सहलीची!</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">याला कारणंही तशीच आहेत.</div><div class="imTAJustify">जंगल पाहणं, जंगल समजून घेणं ही तशी आनंदाचीच गोष्ट ना! निसर्गात तुम्ही गेलात की तो कधीच काहीच हातचं राखून ठेवत नाही. हा अनुभव तुम्हीही घेतलाच असेल. मग त्यातही राधानगरी आणि दाजीपूर सारख्या निसर्ग संपन्न आणि जैव विविधतेने समृद्ध परिसरात जायचं म्हटल्यावर तुम्ही रिकाम्या हाताने परतण्याची शक्यता धूसरच. निसर्ग सौंदर्याने आणि जैवविविधतेने नटलेला हा परिसर तुम्हालाही तितकंच समृद्ध होण्याची संधी देतो. या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">ठरल्या प्रमाणे आम्ही त्यादिवशी सकाळी रंकाळा तलावाकाठी जमलो आणि इथून आमच्या सहलीला सुरुवात झाली. या सहलीतील पाहिलंच ठिकाण होतं राधानगरीचं फुलपाखरू उद्यान! </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">राधानगरीच्या या उद्यानाला यापूर्वीही भेट देण्याचा योग आला होता पण, या सहलीतून या उद्यानाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन मिळाला तो आधीच्या भेटीत मिळाला नव्हता. हे उद्यान म्हणजे फुलपाखरांचे माहेर. फुलपाखरांचे जतन आणि &nbsp;संवर्धन करण्याच्या हेतूने या बागेची रचना करण्यात आलेली आहे. या भेटीत आम्हाला वेगवेगळ्या आकाराची, प्रकारची किती तरी फुलपाखरं इथं बघायला मिळाली. फुलपाखरांचा जीवनक्रम कसा असतो आणि छोट्याशा आयुष्यात त्या या जगला किती भरभरून देतात हे ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर तर, फुलपाखरांबद्दलचा आदर आणखीनच वाढला. फुलपाखरांना आकर्षित करणारी विविध प्रकारची झाडं तिथे मुद्दाम वाढवण्यात आली आहेत. ज्यामुळे फुलपाखरांना आवश्यक पर्यावरण निर्माण होईल. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">फुलपाखरू म्हणजे फक्त एक सुंदर कीटक एवढंच माहित होतं. पण, हा कीटक फक्त दिसायलाच सुंदर नाही तर त्याचं कामही त्याहून सुंदर आहे, याची जाणीव पहिल्यांदा या सहलीत झाली. &nbsp;</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">त्यानंतर आमचा मोर्चा वळला हत्ती महालाकडे! राधानगरी धरणाचं दुरूनच होणारं पण, डोळे दिपवून टाकणारं दर्शन आणि त्या सोबत जोडलेल्या छत्रपती शाहूंच्या आठवणी! मनात आपसूकच एक कृतज्ञतेची भावना तयार होते. नकळत या कार्यापुढे आपण आतून नतमस्तक होतो. हत्ती महाल आता काहीसा मोडकळीस आला असला तरी, त्याची रचना, बांधकाम आणि त्याकाळचा त्यामगचा दृष्टीकोन जाणून घेतल्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं कळकळीनं वाटू लागतं. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">यानंतर आम्ही पुन्हा गाडीत बसलो सोबत असलेल्या बच्चे कंपनीचा चिवचिवाटामुळे प्रवास आणखी गमतीशीर, रंजक होत होता. कुठेही कंटाळा नावाची गोष्ट मनाला शिवली देखील नाही. बोअर होणं काय असतं हे त्या एका दिवसात तर आम्ही पार विसरून गेलो होतो. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">त्यानंतर आम्ही थांबलो हासण्याची देवराई पाहायला. शांत, प्रसन्न, तजेलदार आणि पोषक हवा काय असते? &nbsp;याचा अनुभव इथे आला. पावसाळा संपला तरी इथली हिरवळ ताजीतवानी होती. मन प्रसन्न करण्यासाठी हे ठिकाण खूपच म्हणजे खूपच चांगलं आहे. सोबतच्या तज्ज्ञ लोकांनी इथल्या झाडांची विविध प्रकारची माहिती दिली, त्यांची वैशिष्ट्य सांगितली. पण आता ती काही फारशी लक्षात नाहीयेत. एवढं नक्की कळलं की निसर्गातील छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा निसर्गाच्या, पर्यावरणाच्या भरभराटीत भरभरून आपलं योगदान देत असते. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">उग<span class="fs12lh1-5">वा</span><span class="fs12lh1-5">ई मंदिरामागच्या जंगलात थोडं अंतर चालून गेलो. सोबत आजूबाजूच्या वेगवेगळ्या झाडांची माहिती कानावर पडतच होती. थोडाशा अंतरावर गेल्यावर समोर जो नजारा होता तो पाहून मी तर दिड्मूढ झाले. समोर शेकडो फुलपाखरांचा थवा पंख फडफडवून आपल्या अस्तित्वाचा सोहळा साजरा करत होता. फुलपाखराचं आयुष्य ते किती? तर फक्त चाळीस दिवस. तेही असंख्य संकटं झेलावी तेव्हा मिळणारं. या चाळीस दिवसाच्या आयुष्यात फुलपाखरं किती आनंदानं जगतात आणि नुसती जगत नाहीत तर या इतुक्याशा कालवधीत ती आपल्यातील हजारो लोकांच्या पोटापाण्याची सोय करून जातात. निसर्गातील किती छोट्या घटकावर किती मोठी जबाबदारी आहे बघितलंत? आणि आपण चाळीस वर्षापेक्षाही जास्त दिवस जगणारी माणसं निसर्गाला काय देतो? हा प्रश्न पडला, जाणवला, हेच या सहलीच खरं यश आहे.</span></div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">समोर बागडणाऱ्या शेकडो फुलपाखरांचा थवा बघून तर सहलच काय पण अख्खं आयुष्य सार्थकी लागल्याचा अनुभव आला. स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच की काय? अशी कुतूहलाची आणि कृतज्ञतेची भावना जागृत झाली. यापेक्षा सुंदर असं या जगात पाहण्यासारखं काही असेल का? अजिबात नाही! तो क्षण, ते दृश्य साठवण्यासाठी कॅमेऱ्याची गरजच नव्हती. मनःचक्षुंनी तो प्रसंग असा काही टिपला आहे की, राधानगरी म्हटलं की अपोआपच ती शेकडो फुलपाखरं डोळ्यासमोर नाचू लागतात. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">त्यानंतर आम्ही दाजीपूरच्या प्रवेशद्वाराशी थांबलो. आत जाण्याइतपत वेळ हाताशी नव्हता. त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या परिसरात थोडी सैर केली. शिवगडाचं दुरूनच दर्शन घेतलं. एकूणच परिसर आणि तिथलं सौंदर्य पाहून मन तिथेच हरवून गेलं. मनाची चलबिचल शांत झाली. कुठलाच विचार मनाला शिवणार नाही इतकी शांतता अनुभवायची असेल तर हा परिसर एकदा पाहायलाच हवा. स्वतःला विसरण्याचा, हरवण्याचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे, त्यांनी तरी आवर्जून इथे भेट द्यावी. अंतर्यामी परिवर्तन अनुभवण्यासाठी एक उत्तम ठिकाण!</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">जंगल आहे तर आपण आहोत. आपल्या जगण्यासाठी जितकी आवश्यक आहे तितकी सुद्धा जंगल संपत्ती आपण राखून ठेवलेली नाही. येणाऱ्या पिढ्यांना पुरेल, वाचवेल इतका निसर्ग आपण जपलेला नाही. याची जाणीव सुहास सरांनी करून दिली. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">जंगल म्हणजे आपला गुरु आहे. जंगलाला शरण जाणाऱ्या माणसा इतकं समृद्ध आयुष्य कुणालाच मिळणार नाही. छोट्यातील छोट्या तृणापासून ते हत्ती, गेंडा आणि गव्यासारख्या मोठमोठ्या प्राण्यापर्यंत इथे प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. प्रत्येकजण आपली भूमिका प्रामाणिकपणे वठवतो. आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्यातच त्यांना आनंद आहे. जंगलाकडून ही एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">“हम ना सोचे हमे क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण,” अशी प्रार्थना आपण रोज म्हणत असलो तरी जंगलातील प्रत्येक घटक ही प्रार्थना जगताना दिसतो. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">‘जंगल मे मंगल’, ही म्हण कशी निर्माण झाली माहिती नाही, पण एवढं नक्की आहे, की जंगल मे मंगल असेल तरच संपूर्ण जीवसृष्टी सुखनैव जगू शकते. आपलं जीवनही मंगल बनवायचं असेल तर जंगल जपणं, खूप महत्वाचं आहे. यासाठी फार काही नाही तरी किमान मी निसर्गातील कुठल्याच घटकाला त्रास होईल असं वागणार नाही, झाडच काय पण झाडाचं पान आणि फुलही तोडणार नाही इतकी छोटी प्रतिज्ञा करणं आणि ती जगणंही पुरेसं ठरेल. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">याशिवायही आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार आपण बरच काही करू शकतो आपण. पण, त्यासाठी जंगल समजून घेणं &nbsp;ही पहिली पायरी आहे. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">आयुष्यात जसा एक सच्चा, प्रामाणिक, खंबीर मार्गदर्शक गरजेचा असतो ना तसाच जंगल सफरीत एका अनुभवी, सच्चा आणि जंगलाविषयी तळमळ असणारा वाटाड्या सोबत असणं खूप खूप महत्वाचं असतं. त्याशिवाय जंगलातील 'ज' सुद्धा आपल्याला समजणार नाही. आमच्या सुदैवाने या सहलीत आम्हाला सुहास वायंगणकर आणि कृतार्थ मिरजकर सरांसारखे सच्चे वाटाडे भेटले. त्यांचं जंगला विषयीचं ज्ञान तर अफाट आहेच पण त्याहूनही मोठी आहे जंगलाविषयीची कळकळ, प्रेम आणि कृतज्ञता. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">या दोघांनीही जी माहिती देऊन आम्हाला समृद्ध केलं, आम्हाला जंगलाकडे पाहण्याची सजगता दिली आणि जंगलाबद्दल आमच्या मनात कृतकृत्य भाव जागवला त्याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ऋणात राहू. त्यांच्या तळमळीचा एक टक्का जरी आम्ही अंगी बाणवू शकलो तरी आमचे आयुष्य खूप खूप समृद्ध आणि सुखी होईल, यात शंका नाही. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही किती बँक बॅलन्स मागे ठेवताय ते महत्वाचं नाही तर तर त्यांच्या सुखनैव भविष्यासाठी निसर्ग जपणं महत्वाचं आहे.</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">निसर्गातील प्रत्येक घटक इथे काही तरी देऊन जातो, हे जग अधिक सुंदर करण्यास हातभार लावतो. आपणही हेच शिकलं पाहिजे. आपला जन्म घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी कसा सार्थकी लावता येईल, हे शिकायचं तर, आपल्याही अस्तित्वाचा सोहळा साजरा करायचा असेल तर, &nbsp;तुम्हाला जंगलाचं शिष्यत्व पत्करावं लागेल.</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">भवतु सब्ब मंगलम! </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">मेघश्री श्रेष्ठी</div></div>]]></description>
			<pubDate>Thu, 03 Feb 2022 04:18:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/meghashri-header_thumb.webp" length="518100" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?meghashrishreshti</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/000000009</guid>
		</item>
		<item>
			<title><![CDATA[Radhanagari : one among the world’s top ten hottest biodiversity hotspots]]></title>
			<author><![CDATA[Yash Dabholkar]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=The_Western_Ghat"><![CDATA[The Western Ghat]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_000000008"><div class="imTAJustify"><img class="image-0 fleft" src="https://www.radhanagari.com/images/yash_dabholkar.webp"  title="" alt="" width="250" height="250" /><span class="fs12lh1-5 ff1">Western Ghats is best described as a long stretch of mountains that runs parallel to the western coastline from Dangs in south Gujarat to all the way down to the southernmost tip of Kerala. A UNESCO World Heritage site and one of the world’s top ten hottest biodiversity hotspots, western ghats has biodiversity rivalling only a few others globally. The mountain range also blocks the south western monsoon reaching the Deccan Plateau and is instrumental in feeding almost 40% of India’s natural drainage systems. Formed almost 150 million years ago from breakup of Gondwana from Madagascan edge, the Western Ghats is made up primarily from Basalt dating back to Cenozoic era, although other rock types like granite gneiss and crystalline limestone can be found as well. Red and black soils rich in organic matter are predominant leading to rich and diverse flora in the region.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">As one of the top biodiversity hotspots, the Western Ghats has more than five thousand flowering plants, one hundred and thirty nine mammals, more than five hundred birds and one hundred and thirty nine amphibians of which most are endemic to this region. Numerous butterflies, moths and other invertebrates are also found here one of the most notable being Southern Birdwing – India’s largest butterfly. A large number of fishers including the extremely beautiful Denison’s Barb, Zebra Loach, Malabar dwarf pufferfish, Malabar snakehead and Malabar Mahseer are also endemic here.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">A major source for rivers for the peninsular India, the Western Ghats block the south-western monsoon winds and act as an excellent catchment zone for rainfall. Western Ghats are also responsible for 80% of India’s hydro-electricity generation due to its fast flowing rivers. The area is also a great source of medicinal herbs and a variety of the plants are well-scripted in Ayurveda. Nearly forty-eight protected areas have been established by the Government of India that aim to protect and preserve the natural heritage across this region. Certain locations such as Saputara, Mahabaleshwar and Ooty offer extensive tourism and recreational activities.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1">Although the Western Ghats is geologically older than even the great Himalayas, the ecosystem it harbours is extremely fragile. The Wildlife (Protection) Act, 1972 safeguards designated protected areas, those outside have not been spared the onslaught. Deforestation for plantations like coffee, tea and rubber; wildlife killing for bush-meet as well as seasonal fires and floods still remain major threats. Without contiguous patches of forest, animals like Asiatic elephants and tigers that inhibit these lands are finding it to survive harder, day by day. Invasive species like Lantana and Prosopis threaten not only the native flora but also the fauna that feed and live on it. A conservation approach that works more at the grassroots level is needed that also involves the local people in its course of action.</span></div> &nbsp;<div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"> </span></div><div><span class="fs12lh1-5 ff1">Sincerely,</span></div> &nbsp;<div><span class="fs12lh1-5 ff1">Yash Dabholkar</span></div><div><span class="fs12lh1-5 ff1">Junior Research Fellow,</span></div><div><span class="fs12lh1-5 ff1">Wildlife Institute of India, Dehradun.</span></div><div><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div><div><span class="fs12lh1-5 ff1">Image source : <a href="https://whc.unesco.org/en/list/1342/gallery/" onclick="return x5engine.imShowBox({ media:[{type: 'iframe', url: 'https://whc.unesco.org/en/list/1342/gallery/', width: 1920, height: 1080, description: ''}]}, 0, this);" class="imCssLink">https://whc.unesco.org/en/list/1342/gallery/</a></span></div></div></div>]]></description>
			<pubDate>Sun, 23 Jan 2022 04:17:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/radhanagari-yash_header_thumb.webp" length="559562" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?biodiversity-hotspots</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/000000008</guid>
		</item>
		<item>
			<title><![CDATA[निसर्गाला 'थॅंक यू' म्हणायला विसरू नका]]></title>
			<author><![CDATA[Makrand Ketkar]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=The_Western_Ghat"><![CDATA[The Western Ghat]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_000000007"><div class="imTAJustify"><img class="image-0 fleft" src="https://www.radhanagari.com/images/tagyaa1.webp"  title="" alt="" width="261" height="261" />मंडळी, सृष्टीतील सहचरांसोबत जगताना माणूस म्हणून आपल्याला ज्या वेगळ्या देणग्या लाभलेल्या आहेत त्यापैकी भव्यता, अप्रूप अशा काही जाणिवा आहेत. या जाणिवांमुळेच आपल्याला जगातली अनेक नैसर्गिक आश्चर्ये खुणावतात व त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रोत्साहित करतात. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">अशाच भौगोलिक आश्चर्यांपैकी एक म्हणजे भारताच्या पश्चिम दिशेला, महाराष्ट्र - गुजरातच्या सीमेपासून कन्याकुमारीपर्यन्त पसरलेली साधारण सोळाशे किलोमीटर लांबीची पश्चिम घाट नावाची भव्य पर्वतरांग. जणू एक हिरवी - करडी भिंतच. कोकण आणि देशाला जोडणार्‍या कुठल्याही घाटरस्त्याच्या पायथ्याच्या गावातून पूर्वेकडे पाहिलं की या भिंतीची अवाढव्यता डोळ्याचे पारणे फेडते. आज जरी हे सगळे डोंगर हिरवेगार दिसत असले तरी त्यांची निर्मिती पृथ्वीच्या गर्भातून प्रसवलेल्या धगधगत्या लाव्हारसापासून झालेली आहे. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">साधारण चौदा कोटी वर्षांपूर्वी आपला भारताचा त्रिकोण आज दिसतोय तिथे नसून दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलिया खंडापाशी होता. नंतरच्या काळात पृथ्वीच्या पोटातील भूपट्टांच्या हालचालींमुळे त्याने उत्तरेकडे हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून आजची जागा पटकावली. या प्रवासात सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका खंडाजवळील मादागास्कर बेटाजवळून जाताना तिथल्या भूगर्भातील सक्रिय ज्वालामुखींमुळे पश्चिम किनार्‍यावर लाव्हारसाच्या अक्षरशा: हजारो नद्या वाहू लागल्या व सुमारे तीस ते चाळीस हजार वर्षात टप्प्याटप्प्याने थरांवर थर रचले जाऊन पश्चिम घाट पर्वत रांगेमधील महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग व दख्खनचे पठार तयार झाले. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">प्रवासाच्या या टप्प्यातून पुढे सरकल्यावर अशी जाळपोळ करणारे ज्वालामुखी नंतर वाटेत आले नाहीत म्हणून इथे जीवन स्थिरावू शकले. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">सह्याद्री रांगेच्या निर्मितीचे, त्यातल्या दगडांच्या रासायनिक रचनांनुसार तीन मुख्य कालखंड मानले जातात. पहिला म्हणजे नाशिक किंवा कळसूबाई खंड जो सर्वात आधी तयार झाला ज्यामुळे तिथे कळसूबाईसारखे सर्वात उंच शिखर आहेच पण नाशिक विभागातील डोंगरसुद्धा अधिक झिजलेले आहेत. नंतर येतो लोणावळा खंड जो माथेरानपासून साधारण प्रतापगडपर्यन्त पसरला आहे. तिसरा आणि शेवटचा खंड म्हणजे वाई खंड जो महाबळेश्वरपासून गोवा - कर्नाटक सीमेवरील देसूर पर्यन्त पसरलेला आहेत. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">कोणे एके काळी पार इंदोरच्या वरपर्यंत व्याप्ती असलेला आणि सुमारे पंधरा लाख चौरस किलोमीटर इतका अजस्त्र पसारा असलेला हा प्रदेश आता झिजून झिजून पाच लाख चौरस किलोमीटर एवढा उरलेला आहे. पण तरीही या अभेद्य भिंतीमुळेच मान्सूनचे वारे अडून या कोकण आणि घाटावर प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे पश्चिम घाटात वनस्पती व प्राणी यांचे अद्भुत वैविध्य आढळते. पण पावसाच्या याच अडवणुकीमुळे बिचारे दख्खनचे पठार मात्र शुष्कच राहते. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">आपल्या कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्य हे याच पश्चिम घाटाची देणगी आहे. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">म्हणून, यापुढे फोंडा, अणुस्कुरा किंवा गगनबावडा घाटातून प्रवास करताना उत्तुंग डोंगर पाहायला क्षणभर थांबलात तर निसर्गाला 'थॅंक यू' म्हणायला विसरू नका.</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">- </div><div class="imTAJustify"><div><span class="fs12lh1-5"><b>मकरंद केतकर</b></span></div><div><div>वेबसाईट - <span class="fs11lh1-5"><a href="http://www.insearchoutdoors.com/" target="_blank" class="imCssLink">www.insearchoutdoors.com</a></span></div></div><div><div><span class="fs12lh1-5">फेसबुक - </span><span class="fs11lh1-5"><a href="https://www.facebook.com/mketkar" target="_blank" class="imCssLink">https://www.facebook.com/mketkar</a></span></div></div></div></div>]]></description>
			<pubDate>Thu, 20 Jan 2022 09:33:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/phondaghat_header_thumb.webp" length="528028" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?thank_you_nature</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/000000007</guid>
		</item>
		<item>
			<title><![CDATA[सोनियाचा दिवस बाई, सोनियाची सहल]]></title>
			<author><![CDATA[दिप्ती]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=Treasure_of_Radhanagari"><![CDATA[Treasure of Radhanagari]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_000000006"><div class="imHeading5">सोनियाचा दिवस बाई, सोनियाची सहल</div><div class="imTAJustify"><img class="image-0 fleft" src="https://www.radhanagari.com/images/dipti_dp.webp"  title="" alt="" width="220" height="220" /><span class="fs12lh1-5 cf1 ff1">काही क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्याला सोन्याची झळाळी मिळून ते क्षण "सुवर्णक्षण" होतात. तसंच दिवसांचं ही असतं. कालचा दिवस माझ्यासाठी “सुवर्णदिन” ठरला. कालचा भरलेला दिवस होता राधानगरी, दाजीपूर आणि निसर्गाबद्दल भगवत्भाव असलेल्या श्री. सुहास सर आणि श्री. कृतार्थ सरांच्या ज्ञानासोबत. मंदार दादांनी सुहास सरांची ओळख करून दिली. सुहास सरांनी माहिती द्यायला सुरुवात केली.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">“जंगल म्हणजे काय? अभयारण्यात काय पाहायचं असतं? फक्त जंगलातले प्राणी पाहणं म्हणजे जंगल पहाणं का? जंगलात अनेक जैवविविधता असते. पक्षी, कीटक, साप, प्रचंड प्रकारच्या वनस्पती हे पाहणं, याबद्दल जाणून घेणं, जंगलाला समजून घेणं म्हणजे सुद्धा जंगल पाहणंच असतं. जंगल पाहताना सोबत तीन दागिने ठेवले की जंगल आपल्याला भरभरून दाखवतो. ते तीन दागिने म्हणजे शांतता, संयम आणि निसर्गाप्रती भगवत्भाव.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">हाच भगवत्भाव ठेवून आम्ही जंगल पाहण्याचा, अनुभवण्याचा &nbsp;प्रयत्न केला आणि आम्हाला शेकरू दिसलं. आपल्या “महाराष्ट्राचा राज्यप्राणी” काय कौतुक वाटलं आम्हाला! शेकरू जंगलाच्या कोणत्या भागात राहतो ते कसं ओळखायचं, ते झाडाची पानं कसं खातं? याची माहिती सुहास सरांनी सांगितली. फुलपाखरू उद्यानात कॉमन सेलर हे फुलपाखरू जास्त पाहायला मिळालं. तिथे फुलपाखरांवर अंडी घालणारी, फुलांमधला रस पिणारी अनेक झाडं तिथे आम्ही पाहिली. त्यातलं बदकवेल मला खूप आवडलं. शिवाय आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे झाड “फिश टेल पाम”बद्दल कृतार्थ सरांनी सांगितलं. तसेच समई, खुळखुळा, दिन का राजा, ऑस्ट्रेलियन बाभूळ अशी बरीच झाडं आम्ही तिथे पाहिली.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="ff1"><span class="fs12lh1-5 cf1">नंतर आमची स्वारी हत्ती महाल पहायला निघाली. हत्ती महाला बाबत माहिती मंदार दादांनी दिली. तिथे आम्ही सगळ्यांनी फोटोसेशन केले. तिथे जाऊन फोटो काढून याच.</span><span class="fs12lh1-5 cf1">इथून पुढे मजा मस्ती करत, दंगा करत, हसत आम्ही हासण्याच्या देवराईमध्ये पोहोचलो. नष्ट होत चाललेल्या देवराया का जपल्या पाहिजेत? त्या का नष्ट होत चालल्या आहेत? आणि त्या राखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? याची माहिती सुहास सरांनी सांगितली. आम्ही अजून झाडं बघितली. कास पठारावर फुलणार पहिलं फूल“सोनकी” आम्ही पाहिलं. वाकेरी, रानजायफळ, देवजांभूळ, गारंबीची सगळ्यात मोठी शेंग मदनफळ, सुरंगी, अंजनीचं फुल,गाव्याला आवडणारं कारवी अशी किती, किती आणि काय काय पाहिलं म्हणून सांगू! हे सगळं निसर्गाच्या प्रेमात पाडणारं होतं आणि जाणीवही करून देणारं की हे आपण जपायचंय, याची काळजी घ्यायची.</span></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">नंतर तर आम्ही स्वर्गातच होतो. समोर हजारो फुलपाखरे होती. माझा आनंद गगनात मावेना अक्षरशः! सगळी ब्लू टायगर. आहा! मला प्रचंड म्हणजे प्रचंड आनंद झाला होता.आपल्या जेवण्याच्या प्रत्येक तिसऱ्या घासाला आपण फुलपाखरांचे आभार मानले पाहिजेत कारण परागीकरणाचं खूप मोठं काम फुलपाखरं करतात. ही माहिती सुहास सरांनी सांगितली. नंतर आम्ही शिवगडच्या शेजारी असलेल्या पठारावर गेलो. तिथे थोडावेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवून परतीच्या वाटेला लागलो. </span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">परागीकरण करणारी फुलपाखरं, बचत शिकवणाऱ्या मधमाश्या, भरभरून देणारा निसर्ग आणि याच्या बद्दल आदर म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो म्हणून खूप तळमळीनं सांगणारे सुहास सर.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">हे सगळेच अनुभव विलक्षणीय &nbsp;आहेत माझ्यासाठी. सुहास सरांनी &nbsp;सांगितलेला एक नी एक शब्द मनाला भिडणारा होता.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">आपणही &nbsp;अशी तळमळ आपल्यात आणण्याचा प्रयत्न करुया. त्यासाठी निसर्गासोबत राहूया. निसर्गाबद्दल कृतज्ञ राहू या.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">धन्यवाद.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 ff1"><br></span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">दिप्ती,</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">आनंदी बालभवन,</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">कोल्हापूर.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">९जानेवारी, २२</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5 cf1 ff1">९१५८९९८८३१</span></div></div>]]></description>
			<pubDate>Thu, 20 Jan 2022 04:12:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/diptii-header_thumb.webp" length="451224" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?radhanagari_trip</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/000000006</guid>
		</item>
		<item>
			<title><![CDATA[निसर्गाचा अद्भुत अविष्कार : राधानगरी]]></title>
			<author><![CDATA[सौरभ मुजुमदार]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=History_of_Radhanagari"><![CDATA[History of Radhanagari]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_000000004"><div class="imTAJustify"><img class="image-0 fleft" src="https://www.radhanagari.com/images/dp.webp"  title="" alt="" width="211" height="211" /><span class="fs12lh1-5">कोल्हापूर जिल्हा आजही सुजलाम-सुफलाम असण्याचे कारण म्हणजे केवळ राधानगरी धरण होय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी इंग्लंडला जाऊन आल्यानंतर त्यांना प्रजेच्या हिताची ही कल्पना सुचली. आपल्या राज्यासाठी इसवी सन १९०७ रोजी शाहू महाराजांना दाजीपूरच्या जंगलात भोगावती नदीवर मोठे धरण बांधण्याची योजना आखली. एप्रिल १९०७ ला प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि अभ्यासाला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या मध्यात इसवीसन १९०९ ला महाराणी लक्ष्मीबाई हे आपल्या पत्नीचे नाव महाराजांनी या धरणाच्या तलावाला दिले. &nbsp;त्यावेळी धरणाच्या कामासाठी साधारणपणे दोन हजार कामगार कार्यरत होते. &nbsp;</span></div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">मेहरबान पिराजीराव बापूसाहेब घा</span><span class="fs12lh1-5">ट</span><span class="fs12lh1-5">गे</span><span class="fs12lh1-5"> </span><span class="fs12lh1-5">म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचे थोरले बंधू यांचे मोलाचे मार्गदर्शन या धरणासाठी मिळाले. दाजीपूरच्या जंगलातील याच लक्ष्मी तलावाजवळ स्वतः छत्रपतींनी आपली राजकन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब यांच्या नावाने एक टुमदार शहर वसविले. तेच हे 'राधानगरी' शहर होय. याच परिसरात लोकवस्ती वाढावी यासाठी त्यांनी वसाहती निर्माण केल्या व शासकीय कार्यालये चालू केली. राधानगरी धरणाच्या बांधकामात महाराजांनी भरमसाठ संपत्ती खर्च केली. महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांचे हे काम त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी पूर्णत्वास नेले. &nbsp;</span><br></div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">जगातील अतिसंवेदनशील समजला जाणारा, पश्चिम घाटमाथ्यावरील निसर्गाचा वरदहस्त असणारा हा परिसर त्यावेळी करवीरच्या छत्रपतींनी शिकारीसाठी राखीव ठेवला होता. अनेक ब्रिटिश अधिकारी, हिंदुस्थानातील इतर संस्थानिक, महाराजांचे स्नेही त्यावेळी राधानगरीच्या या जंगलात भेट देण्यास येत असत. &nbsp;कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना केवळ प्रबळ इच्छाशक्ती व सामान्य प्रजेच्या भविष्यातील सुखद जीवनासाठी असणारी तळमळ याच जोरावर उभे राहिलेले राधानगरी धरण पाहण्यासाठी जगभरातील अभ्यासक </span><span class="imTALeft fs12lh1-5">त्याकाळी </span><span class="fs12lh1-5">येत होते.</span></div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">राधानगरीच्या या परिसराचा प्रामुख्याने विकास झाला तो राजर्षी शाहू महाराजांच्या वास्तव्यामुळे. त्यावेळी राखीव ठेवलेला हा भाग आज एक परिपूर्ण व विकसित वन्यजीवांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखला जातो. अनेक दुर्मिळ वनस्पती, फुलझाडे, उभयचर व सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे अस्तित्व आजही येथे आहे. याच धरणाच्या पाणी साठ्यावर केवळ कोल्हापूर जिल्हा विकसित झाला नसून सोबत पाणवठ्यावर येणारी &nbsp;अभयारण्यातील अनेक जनावरे आपली तहान भागवीत.</span></div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">राधानगरी परिसरात विशाल-महाकाय बलशाली हत्तींना राहण्यासाठी साकारलेला हत्ती महाल; या हत्तींसोबत झुलकावणी देण्याच्या अद्भुत साठमारी खेळासाठी उभारलेले साठमारीचे आगड अशा अनेक वास्तू आजही ताठ मानेने उभ्या आहेत. &nbsp;</span></div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव याच सोबत आजही अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये दडलेला राधानगरीचा इतिहास पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचा समतोल साधत आता पर्यटन वाढीस अत्यंत अनुकूल आणि सुरक्षित असा हा राधानगरीचा परिसर दुसरे स्वर्गच म्हणण्यास काही हरकत नाही.</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">-</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">सौरभ मुजुमदार</span></div><div class="imTAJustify"><span class="fs12lh1-5">दै</span><span class="imTALeft fs12lh1-5">नि</span><span class="fs12lh1-5">क</span><span class="fs12lh1-5"> तरुण भारत, कोल्हापूर.</span></div><div class="imTAJustify"><br></div></div>]]></description>
			<pubDate>Wed, 19 Jan 2022 03:51:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/radhanagari-header_thumb.webp" length="457904" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?राधानगरी</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/000000004</guid>
		</item>
		<item>
			<title><![CDATA[आपला नैसर्गीक वारसा जपण्याची गरज]]></title>
			<author><![CDATA[Jaysing Chavan]]></author>
			<category domain="https://www.radhanagari.com/blog/index.php?category=Treasure_of_Radhanagari"><![CDATA[Treasure of Radhanagari]]></category>
			<category>imblog</category>
			<description><![CDATA[<div id="imBlogPost_000000005"><div class="imTAJustify"><img class="image-0 fleft" src="https://www.radhanagari.com/images/jaysing.webp"  title="" alt="" width="207" height="207" />२०१४ साली चित्रकलेचे शिक्षण घेत असतानाच माझ्या हातात कॅमेरा आला. कोल्हापूर शहरातील गजबजलेली ठिकाणं आणि तेथील लोक यांची छायाचित्र टिपणं माझ्या आवडीचं झालं होतं.</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">एके दिवशी माझे शिक्षक गिरीश सर यांचे बरोबर &nbsp;निसर्गसंपन्न आणि शांत अशा "दाजीपूर" ला जाण्याची संधी मिळाली. आमच्या बरोबर काही निसर्ग अभ्यासक पण होते. त्यांच्या बरोबर पहिल्यांदाच निसर्ग वाचनाची ओळख झाली. आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी इतकं काही आहे. डोळ्यांनी दिसणारं जग वेगळंच पण सूक्ष्म ते अति सूक्ष्म जग हे वेगळंच. याची जाणिव तेव्हा पहिल्या फेरीतच मला झाली. ती पहिली फेरीच इतकी अभ्यासपूर्ण होती की त्यामुळे माझा या अभयारण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला गेला. त्या नंतर आता पर्यंत खूप वेळा दाजीपुर जंगल भ्रमंतीसाठी मी सातत्यानं येत आहे. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">दाजीपुर म्हणजे नुसता "गवा" हा विचार जर बाजूला ठेऊन अभयारण्यात पाहिलं तर खूप काही आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळेल. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत. फुलपाखरांचं एक विलोभनीय आणि अद्भुत जग इथं अस्तित्वात आहे. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">जंगलाची होणारी नासधूस आणि यामुळे पर्यावरणीय समस्या आता काही कालपोकल्पित कथा राहिल्या नाहीत. वस्तुस्थिती आता अगदी स्पष्ट आहे. आपण चाललो आहोत तो एक विनाशकारी मार्ग आहे आणि याचा आपण कोल्हापूरकरांनी आणि सगळ्या जगानं सुद्धा अनुभव घेतला आहे. आपण स्वतःचा विनाश ओढवण्यात मग्न आहोत. इतका मोठ्ठा वारसा आपल्याला अभ्यासासाठी आणि वाढवण्यासाठी उपलब्ध असताना कोल्हापूरकरांना या जागतिक वारशाबद्दल जास्त माहीत नाही असं मला वयक्तिक वाटतं. </div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">अभयारण्य म्हणजे मज्जा, मस्ती, दंगा हा विचार बाजूला ठेऊन नव्या पिढीला ती एक आपली वैयक्तिक जवाबदारी आहे हा विचार द्याला हवा. आपण आजच सुधारात्मक कार्यकृती केली नाही तर आपण जो &nbsp;वारसा पुढे आपल्या मुलाबाळांना देऊ ज्यांची आपल्याला लाज वाटेल. आपली पुढील पिढी आपला द्वेष करेल यात शंकाच नाही.</div><div class="imTAJustify"><br></div><div class="imTAJustify">-</div><div class="imTAJustify"><div>जयसिंग चव्हाण, कोल्हापूर. </div><div>आर्टिस्ट आणि फोटोग्राफर </div><div><span class="fs12lh1-5">संपर्क - </span>9503086629</div></div></div>]]></description>
			<pubDate>Fri, 14 Jan 2022 04:40:00 GMT</pubDate>
			<enclosure url="https://www.radhanagari.com/blog/files/jaysing_header_thumb.webp" length="503360" type="image/webp" />
			<link>https://www.radhanagari.com/blog/?आपला_वारसा</link>
			<guid isPermaLink="false">https://www.radhanagari.com/blog/rss/000000005</guid>
		</item>
	</channel>
</rss>